शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जमिनीच्या वादातून चुलत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:58 IST

कºहाड/ तांबवे : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा दगडाने ठेचून खून केला. पाठरवाडी (ता. कºहाड) येथे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळकृष्ण ऊर्फ कृष्णात रामा यादव (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर संजय ज्ञानदेव यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या ...

कºहाड/ तांबवे : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा दगडाने ठेचून खून केला. पाठरवाडी (ता. कºहाड) येथे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळकृष्ण ऊर्फ कृष्णात रामा यादव (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर संजय ज्ञानदेव यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठरवाडी येथे बाळकृष्ण यादव यांची शेतजमीन आहे. जमिनीशेजारी पुतण्या संजय यादव याचीही जमीन आहे. अनेक वर्षांपासून या दोन कुटुंबांत जमिनीवरून वाद होता. या वादातूनच त्यांची अनेकवेळा हमरीतुमरी तसेच मारामारीही झाली होती. रविवारी सायंकाळी बाळकृष्ण ‘हुमणीचा पेढा’ नावाच्या शिवारातील शेतामध्ये होते, तर त्यांची पत्नी ‘टेकडी’ नावाच्या शिवारातील शेतात काम करीत होती. सायंकाळच्या सुमारास पुतण्या संजय टेकडी नावाच्या शिवारात गेला. त्या ठिकाणी त्याने बाळकृष्ण यांच्या पत्नीशी वाद घालून हाताने मारहाण केली. तसेच तो तेथून थेट हुमणीचा पेढा नावाच्या शिवारामध्ये बाळकृष्ण यांच्याकडे गेला. (पान १० वर)शेतात बाळकृष्ण काम करीत असताना त्याने त्यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी बाळकृष्ण यांनी त्याला प्रत्युत्तर केले. या वादातच त्यांची झटापट होऊन संजयने रागाच्या भरात नजीकच पडलेला दगड उचलून बाळकृष्ण यांच्या डोक्यात घातला. घाव वर्मी बसल्याने बाळकृष्ण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. मात्र, तरीही संजयने दगडाचे अनेक घाव बाळकृष्ण यांच्या डोक्यावर घातले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर संजय तेथून निघून गेला.पुतण्याला घरातून घेतले ताब्यातबाळकृष्ण यांचा खून केल्यानंतर संजय तेथून घरी निघून गेला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता संजयने खून केला असावा, असा संशय बाळकृष्ण यांच्या पत्नीने व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन संजयला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास काही ग्रामस्थ शेतातून घरी जात असताना बाळकृष्ण रक्ताच्या थारोळ्यात मृत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती तातडीने कºहाड तालुका पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, उपनिरीक्षक ए. एस. भापकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिला. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.

टॅग्स :Crimeगुन्हा